निर्भयतेने चालत राहू मार्ग भला आपुला
श्री सदानन्द मास्टर, प्रायमरी शाळेतील एक अतिसामान्य शिक्षक. राष्ट्राच्या भावी पिढीला घडवणारा, माणूस बनवणारा माणूस.
केरळ, देवभूमी केरळ त्याचं कार्यक्षेत्र. स्वतःशी, स्वमताशी प्रामाणिक अशी ही व्यक्ती. संघाचा परीसस्पर्श त्याला होतो काय आणि एकेकाळी कट्टर कम्युनिस्ट असणारा हा मास्तर परिवर्तित होतो काय? सारंच दिग्मूढ करणारी सदानंद मास्तरची ही कहाणी.
त्यांच्या परिचयातील अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते देखिल संघ स्वयंसेवकांच्या आपुलकीच्या,निर्व्याज प्रेमाच्या वागणुकीने , सहज मैत्रभावाने संघाकडे आकर्षित होउ लागले. पण असिधारा व्रत काय चीज़ असते याचं प्रत्यंतर त्यांना यायला सुरवात झाली. संघ विचार जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणणे किती महाकठीण कर्म हे स्वयंसेवकांनाच माहित. त्यात तुम्ही केरळचे म्हणजे अग्निदिव्यच.
वर्ष १९९४, बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वितरण मित्रा सोबत घरी परतत असताना सदांनद मास्टर वर अत्यंत निर्घृण हल्ला झाला आणि त्यांना धडा शिकवण्यासाठीअसहिष्णु कम्यूनिस्ट लोकांनी त्यांचे दोनही पाय गुडघ्याखाली कापून टाकले. कारण काय तर म्हणे आमची पार्टी सोडून हा माणूस आम्हाला मान्य नसणार्या विचारधारेच्या लोकांबरोबर काम करतोय आणि आमच्या पक्षाच्या इतर लोाकांनाही स्वतःसोबत घेऊन जातोय. ( खरी असहिष्णुता तर हीच आहे.) मित्राने कसेबसे ambulance मध्ये ढकलले आणि हॉस्पिटल ला नेले.आणि हो सोबत नेलेत कापलेले दोन पाय. का माहित आहे? उद्या जाऊन सदानंदला पायच नव्हते ऐसे म्हणायला कमी करणार नव्हते विरोधक.
वादळ उठता लोट धुळीचे आकाशी उडती
मेघांचे अवडंबर येता दिशा मंद होती
मेघांचे अवडंबर येता दिशा मंद होती
ह्या हल्ल्यानंतर सदानंदजी सोबत होते कितीतरी दिवस आणि रात्री मन बेचैन करणार्या. जगण्याची आशाच संपून जाईल, आता पुढे काय? घर कसं चालवणार? बायको काय करेल? मुलं शिकतील कसं? किती प्रश्न त्यावेळी मनात आले असतील? पत्नीने पुढे केलेला घास तसाच आणि नजर शून्यात. अगदी नेहमी सोबत करणारी पुस्तके सुद्धा हतबल झाली होती. आणि पत्नीजवळ राहिले होते अवघ्या तिशीतले आणि सहा फूट उंचीचे सदानंदजी " पाय आणि जगण्याची उमेद गमावून बसलेले". पण सदानन्दजींच्या पत्नीने त्यांना सावरले, उभारले.
एक दिवस त्यांच्यावर हल्ला करणारे क्रूर लोक क्षमा मागायला आले तर महाशय हसत हसत त्यांना म्हणतात विसरून जा. नियतीच्या मनात जे होतं ते झालं. आपण मिळून परत ह्या मतृभूमीची सेवा करुया.
धन्य ते सदानंद मास्टर आणि धन्य त्यांना घडवणारा तो जनमन शिल्पी.
काळ सुखाचा कधी जीवनी दुख कधी उपजे
उजेड पसरे तसाच केव्हा अंधारहि माजे
दिन रात्रीचा नित्य असे हा पाठलाग चालला॥
उजेड पसरे तसाच केव्हा अंधारहि माजे
दिन रात्रीचा नित्य असे हा पाठलाग चालला॥
निर्भयतेने चालत राहू मार्ग भला आपुलाअनुकुल प्रतिकुल काळाचा हा खेळ असे चालला॥
(Note: His marriage was fixed that time n he get married later)
(Note: His marriage was fixed that time n he get married later)
No comments:
Post a Comment