Thursday, 23 January 2014

राजा दिलीप
एकदा देवल मुनींना  शरभ ऋषींनी विचारले की, " हे मुनिवर्य, हा राजा दिलीप कोण होता? आणि जिची उपासना केल्याने त्यास पुत्रप्राप्ती झाली ती नंदिनी कोण होती? 
ह्या प्रश्नावर देवल उत्तरले, "दिलीप हा वैवश्वत मन्वंतरातील एक थोर राजा होता . तो त्याच्या प्रजेशी अत्यंत न्यायाने  वागत असे आणि प्रजाजनांना सुखी ठेवत असे. अनेक वर्ष झाल्यावर देखील त्याला आणि राणी सुदक्षिणा ह्यांना मुलबाळ झाले नव्हते. दिलीप विचार करी की, मी काहीही पातक केले नसताना मला मूलबाळ का नाही?  मी असाच निघतो आणि आमचे गुरु वसिष्ठ ह्यांनाच याबद्दल विचारतो. हा विचार करून तो राणी सुदक्षिणा हिला घेऊन सायंकाळी वासिष्ठांकडे गेला. वसिष्ठ ऋषी आणि त्यांची पत्नी सती अरुंधती यांचे वंदन करून ते दोघे जवळच आसनस्थ झालेत. ऋषींनी राजाचा हात मोठ्या प्रेमाने थोपटत त्यांस विचारले, "हे राजा ज्या राज्यात सर्व प्रजा अत्यंत सुखी आहे, सर्व लोक धर्माचरणाने ,वागत आहेत, सैनिक त्यांचा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त आहेत अश्या तुझ्या सारख्या राजाला स्वर्ग  प्राप्तीची  काय गरज?" आणि "तुम्ही दोघे असे उदासीन का दिसता आहात? प्रत्यक्ष स्वर्ग ज्याच्या राज्यात अवतरला आहे अश्या राजा दिलीपास  इकडे गहन अरण्यात मजकडे यायची काय गरज आहे? इक्ष्वाकू कुळातील तू तर तुझ्या पुत्रास अभिषेक झाल्यानंतरच वानप्रस्थश्रम स्विकारण्यास ह्या निबिड तपोवनात यायला हवे होते."
राजा उत्तरला, "हे प्रभो, मी इथे तपस्या करण्यास नव्हे तर काही गंभीर प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलो आहे.  जसे माझे शैशव बघता बघता संपून तारुण्य प्राप्त झाले तसेच मला तर वाटते कि पुत्रमुख न पाहताच मला वार्धक्य येणार. जर मला मुलबाळ झाले नाही तर मजनंतर ह्या पृथ्वीचा सांभाळ कोण करणार?  ह्याबद्दल जबाबदार कोण? माझ्या हातून काही पातक झाले का? तसे असेल तर मला काही सांगाल काय?"
वसिष्ठ यावर उत्तरले, " हे राजन, फार पूर्वी तू तुझ्या महालात परतत असताना बाजूला कल्पवृक्षाखाली उभ्या असणाऱ्या  कामधेनुकडे तू दुर्लक्ष केले होतेस. तेव्हा ती  कामधेनू  रागावली आणि तिने तुला शाप दिला की, तू माझ्या मुलीची सेवा केल्याशिवाय तुला पुत्रप्राप्ती होणार नाही." म्हणून तू तुझ्या पत्नी समवेत आता "नंदिनीची" (कामधेनूची पुत्री) सेवा करायला हवीस. तेव्हा नंदिनी आश्रमातच उभी होती. वसिष्ठांनी तिची सेवा करण्याची आज्ञा राजास  दिली. 

देवल मुनी म्हणाले, " दुसऱ्या  दिवशीपासून सुदक्षिणा नंदिनीची मनोभावे सेवा करू लागली आणि दिलीप तिला चरण्यासाठी वनात नेऊ लागला. ती खाली बसल्यावरच तो देखील बसे, तिने पाणी पिल्यानंतरच  तो पाणी पीत असे. तो तिला खाऊ घालीत असे, तिला किडे, माश्यांच्या त्रासापासून वाचवीत  असे. आश्रमात परतल्यावर राणी तिची पूजा करी. असे २१ दिवस झालेत आणि राजाची परीक्षा घेण्यासाठी नंदिनी हिमालयातील एका गुहेत शिरली. ती गुहा एका सिंहाची होती  आणि त्या सिंहाने नदिनिवर आक्रमण केले. नंदिनी जोरजोरात हम्बरडे  फोडू लागली. ते ऐकून राजा आत शिरला आणि त्याने त्या सिंहावर बाण रोखून धरला.  परंतु सिंहाने  दिलीप लकवा मारल्यागत जागीच  खिळून राहिला. तो बाण सुद्धा सोडू शकला नाही. तो दिग्मूढ  तसेच आश्चर्यचकित झाला.
सिंहाचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून त्याच्या आश्चर्यास पारावर राहिला नाही. सिंह म्हणाला, " हे राजन, तू सुर्यावंशातील राजा दिलीप आहेस हे मी ओळखले आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांच्या नंदीवर बसून माझ्यावर त्यांचा पाय ठेवून आहेत. म्हणून तू मला मारू शकणार नाहीस. तू आता परत जा आणि स्वतःचा जीव वाचव. हि गाय आता माझे भक्ष्य आहे. प्रत्यक्ष देवानेच तीस मजकडे पाठवले आहे.
राजा बोलला, " अरे सिंहा, माझ्या गुरुनी नंदिनीची काळजी आणि रक्षण करण्याचे दायित्व मला सोपवले आहे. आतापर्यंत  मी तिची चांगली काळजी घेत आलो आहे. मी तिला रोज पुजतो. प्रत्यक्ष शंकर भगवान तुझ्या सोबत असल्याने मी तुझ्या तावडीतून बळजबरीने तिची सुटका करु शकणार नाही हे मला कळते आहे. नंदिनीच्या  बदल्यात तू मला खा पण तिला कृपया सोडून दे." असे करण्याने ऋषींच्या आश्रमातील नित्य नैमित्तिक कार्याला नंदिनीचा होणारया उपयोगाला देखील आश्रम वासियांना मुकावे लागणार नाही, तसेच तुझी भूक देखील भागविल्या जाईल. आणि मला देखील गायीचे प्राण वाचविल्यामुळे सद्गती मिळेल.
हे ऐकून तो सिंह जर शांत झाला. राजाने त्या समोर आपले मस्तक झुकविले आणि तो सिंह आपणास आता खाईल  याची वाट बघू लागला. पण सिंहाच्या तीक्ष्ण नखांचा स्पर्श होण्याऐवजी  आकाशातून दिलीप राजावर पुष्पवृष्टी होऊ लागली. 
"वस्ता उठ", राजाने ऐकले. तो उठून बघू लागला तर सिंह तिथे नव्हता. नंदिनी म्हणाली, " हे राजा, हि माझी माया होती. प्रत्यक्ष यमराज आले तरी ते माझे वाईट करू शकत नाहीत. स्वतःच्या
प्राणांचा त्याग करून तू माझे रक्षण करण्यास तयार झाला. हे बघून मी प्रसन्न झाली आहे. हवा असलेला वर तू मला माग. मी नक्कीच तो पूर्ण करीन. दिलीप डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, " हे देवी, तुझ्या पासून काय लपून आहे? माझ्या वंशाचे नाव पुढे असेच कीर्तिमान करणारा पुत्र मला  हवा आहे." 
नंदिनी यावर हसून उत्तरली, " हे राजन, पानांचा द्रोण करून तू त्यात माझे दुध भरून घे आणि ते दुध पिल्यावर तुला सर्व शस्त्रविद्येत पारंगत असा पुत्र प्राप्त होईल. "हा संवाद झाल्यावर नन्दिनिसह राजा दिलीप आश्रमात परतला.
 राजाचा प्रसन्न चेहरा बघून वसिष्ठ मुनी सर्व  गेले. ते म्हणाले, " हे राजा, आजची रात्र नंदिनीची सेवा करण्यात व्यतीत करून तू आणि राणी उद्या सकाळी आपल्या व्रताची सांगता करा  आणि अयोध्येत परत जा.
लवकरच राजा दिलीप आणि राणी सुदक्षिणा  ह्यांना पुत्ररत्नचि प्राप्ती झाली. मुलाचे नाव ठेवण्यात आले रघू. पुढे रघु राजाच्या नावानेच इक्ष्वाकू वंश हा रघु वंश ह्या नावानेही जगात मान्यता प्राप्त झाला.
 

Monday, 20 January 2014

राजा रंतिदेव



King Rantideva


Those were the glorious days in ancient India (Bharat) when men were honest and truthful and kings were ever engaged in striving for the welfare of their people. In such times there once lived a king whose named was Rantideva. He had a large and generous heart and every being came within his embrace of love for he saw Lord Vishnu in every living creature.
King Rantideva was always making gifts to the poor and the needy. He was famous in the world for his warm hospitality which he extended to rich and poor alike. Thus, passed many years of prosperity and people basked in the generous love of their king. But then a time came when the country was hit by famine. The crops failed, the cattle died and men, women and children starved in large numbers. They flocked to the gates of the king‛s palace. Rantideva would sit and pray, “O Lord, give me the strength to remove their suffering.” Then he would go out and distribute to his people what little he had left. And yet the famine continued. In fact it grew worse from day to day.
And there was a time when he did not have enough to eat for himself. He could not even feed his family. None of his family members ate unless the masses had been fed. Sometimes there would be food for his family members, but he himself would have to go hungry. Nevertheless, he was happy, because his mind was satisfied when his people were fed.
As the conditions grew worse, the king did not have anything left to give to the hungry and the starving people. No help came to him. And yet his faith in Lord Vishnu only increased. Day after day, the king and his dependents starved and the famine persisted.
When the king had thus fasted for forty-eight days, someone brought him a bowl of porridge made of flour, milk and ghee. By this time the king was in no position to even move, so weak had he become due to continuous starvation. Overcome by hunger and thirst, Rantideva and his family were indeed glad to see an unexpected meal before them. They were about to eat when there came to the door, a wrinkled old Brahmin, much in need of food. The king received him respectfully and gave him some of the porridge to eat. As they were about to eat again, a beggar came to the door. His face appeared pinched with hunger, so Rantideva gave him too, some of the meal to eat. Then there came a sweeper and he brought with him his dogs. He looked at the king pitifully and said, “Maharaj! My dogs and I have not had any food for many days now. We are starving for want of food. Now we have come to you, for if you will not help us, who will?” So the king gave him the remaining porridge.
Now the king and his family had again no food to eat. There was just a little drink left. Just then, came a Chandala, his throat parched with thirst, his eyes heavy with exhaustion. He begged the King to moisten his dry lips with a little bit of water.
Rantideva held the cup to his cracked lips. He prayed to the Lord and said, “Please, Lord! I do not care for the rewards of this earth. Nor do I care for powers of any kind. My only prayer is - give me the capacity to feel the pain of others and the power to serve them. Let me not ever be indifferent to their sorrows and their sufferings. Make me the instrument to give them relief, to make them happy.”
The man drank the water. The life came back into his eyes. And what a surprise!! The king felt his own hunger, thirst and fatigue dropping away from him. He and his family members felt refreshed and fulfilled. Suddenly, the Maya, the consort of Lord
Vishnu, appeared before him. She smiled at him and said, “O King, I am indeed pleased to see your devotion and your extraordinary love for your people. You have suffered much. If you worship me now, I can remove all your wants for all time to come. I can give you the riches and the entire wealth of the world.”
Rantideva showed Maya due respect, but asked her for nothing. He said to her, “I have no use for all the riches you have to offer me. I have no wish to live any longer than I have to. I do not hanker for the enjoyments of the world, because my mind does not run after them.” Maya, then, vanished like a dream does when a person awakes.
Then Rantideva was blessed by the presence of the Lord Himself. He  worshiped Him and prayed that he might never be separated from Him. In time, Rantideva became one of the greatest yogis of the land. He merged himself in meditation. By his wonderful service to his people and his love for all living creatures whom he worshiped as Lord Vishnu, he attained the blissful Being of Lord Narayana.
प्रस्तावना  ऋणनिर्देश
लहानपणापासून  गोष्ट  ऐकणे  हा  फार  आवडता  छंद  आणि हा  छंद जोपासल्या गेला तो आई-बाबांनी  सांगितलेल्या  गोष्टी, त्यांनी आणून दिलेली  पुस्तके ह्यांमुळे. वाढत्या वयाबरोबर  गोष्टी ऐकता  ऐकता  त्या सांगितल्या देखिल  गेल्या पाहिजे हां संस्कार संघाच्या शाखेतून नकळत  होत  गेला. काठाकाथानातून  मिळणारा बोध हा त्या कथेचा खरा गाभा असतो  देखिल  संघातच कळू लागले.  पुढे संघाची बौद्धिके ऐकताना लहानपणीच्या ह्या कथा आपल्या जीवनात खूप मोठे परिवर्तन आणत असतात हे उमगू लागले. 
ह्या कथांचा संग्रह असावा असे पुढे वाटू लागले. त्यामागची प्रेरणा देणारे श्रॆ. संजय  तारे ह्यांचा ऋणनिर्देश करणे हे इथे मी आवश्यक समजतो. 
प्रचारक असताना पुण्याचे मित्र (हे तेव्हा गुहागरला प्रचारक होते) श्रॆ. विश्वेश पंडीतांच्या प्रेरणेने असा कथा संग्रह लिहिण्याचे काम सुरूही झाले होते, पण ती वही वर्षभरातच हरविली. 
नव्या युगातील प्रौद्योगाकीमुळे आता जनमनशिल्पी नावाने ब्लॉग  सुरु करतो आहे. हा ब्लॉग  एक कथा संग्रहच राहणार आहे. वेळोवेळी ऐकलेल्या कथा विषय वर्गवार लावण्याचा ह्यात प्रयत्न आहे. हा भगवान जगन्नाथाचा रथ समजून आपणास माहित असलेल्या कथा जरूर पाठवाव्यात ही नम्र विनंती. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

थोडे उपक्रमाविषयी
भारत ही पुण्यभूमी म्हटल्या जाते ती  इथल्या तपस्वी, राजर्षि, महर्षि, विदूषी ह्यांनी  केलेल्या तपामुळे, साधनेमुळे. "झाले बहु होतील बहु " अशी नररत्नांची जणू मांदियाळी  ह्या भरतवर्षात होऊन गेली.
एतद्देश प्रसूतस्य सकाशदाग्रजन्मन: |
स्वम् स्वम् चरित्रं  शिक्षेरन पृथिव्यां सर्व मानवा: ||
ह्या देशात जन्मलेल्या प्रत्येक चरित्राचे पृथ्वीवरील सर्व मानवांनी अध्ययन करावे, असे सुभाषितकारांनी विषद केले आहे, ते  उगीच नव्हे. आपण ह्या लेखमालेत अश्या थोर स्त्री-पुरुषांची चरित्रे  बघणार आहोत. 
तर  सुरवात करुया विजिगीषु , पराक्रमी त्याच बरोबर दयाळू , कलाकारांची पारख असणारे अश्याआपल्या भरतवर्षातील  महापराक्रमी, तेजस्वी, चक्रवर्ती अश्या प्रजाप्रतिपालक राजां पासून.